कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर परिसरात "छत्रपती शिवाजी महाराज की जय"च्या गजराने वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमात प्रा. विकास सोनवणे यांनी राज्याभिषेकाचा ऐतिहासिक व राजकीय महत्त्व विशद केले. माजी नगरसेवक रोहन मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “भुईकोट किल्ला हे पवित्र ऐतिहासिक ठिकाण निवडून आपण पुढील पिढीला आपल्या इतिहासाची ओळख करून दिली आहे.”
या वेळी देविदास पाटील यांनी शिवरायांच्या बालपणावर प्रकाश टाकत प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार यांनी "ज्येष्ठ नागरिकांचा पुढाकार आमच्यासाठी प्रेरणादायी आहे," असे मत व्यक्त केले. सद्गुरु महिला गटाच्या प्रमुख सुवर्णा पाटील यांनीही भावनिक मनोगत मांडले.
कार्यक्रमाची संकल्पना बंडू वाणी, प्रा. पुरकर, डॉ. अनिल गुजराती, दिनेश गुजराती या मार्गदर्शक व आयोजक मंडळींची होती. कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवला.
मराठा सेवा संघाचे डॉ. शांताराम पाटील, छावा संघटनेचे विजय पाटील, शेतकरी संघटनेचे किशोर पाटील व सेवा संघाचे उपाध्यक्ष सतीश माने यांनी आपल्या उपस्थितीतून कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले व आयोजकांचे अभिनंदन केले.
शिवराज्याभिषेक सोहळ्यामुळे पारोळा किल्ल्याला पुन्हा एकदा इतिहासाच्या गौरवशाली स्मृतीने उजाळा मिळाला.
0 टिप्पण्या