ही वारी केवळ ऐतिहासिक पर्यटन नसून, युवामनात शिवरायांची शिस्त, नीतिमत्ता व स्वराज्यविचार रुजवण्याची चळवळ आहे. दि. ७ ते १० जूनदरम्यान होणाऱ्या या चार दिवसीय मोहिमेद्वारे सुमारे ९०० किमीचा प्रवास केला जाणार आहे.
👥 जळगाव न्यूज WhatsApp 📲 ग्रुपमध्ये सामील व्हा - https://chat.whatsapp.com/GPfOU1xWIscHfOTnpd7ouM
रायगड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार, हिंदवी स्वराज्याचा उगमस्थान. याच गडावर ६ जून १६७४ रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच पवित्र आठवणींना उजाळा देण्यासाठी विद्यार्थ्यांना रायगड वारी घडवून आणली जात आहे.
इतिहासाचा वारसा – भविष्यातील दिशा
२०१९ मध्ये ४०० युवकांसह रायगड वारी, २०२२ मध्ये १५०० तरुण, तर ३५०व्या राज्याभिषेक वर्षात तब्बल ३५०० युवकांनी रायगडाला नमन केले. यंदा अकरावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेऊन मेरिटप्रमाणे निवड करण्यात आली.
मोहिमेचा खरा हेतू?
स्वराज्याची संकल्पना नव्या पिढीच्या मनात खोलवर रुजवणे, त्यांच्यात राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, समाजभान जागवणे आणि "मीसुद्धा काहीतरी मोठं करू शकतो" हा आत्मविश्वास निर्माण करणे हे या मोहिमेचे अंतिम उद्दिष्ट आहे.
“शिवरायांचा इतिहास केवळ तलवार चालवणाऱ्या योद्ध्याचा नव्हे, तर विचारांनी राष्ट्र घडवणाऱ्या नेतृत्वाचा आहे. अशाच नेतृत्वाच्या गुणांनी युक्त तरुण घडवणे हे माझं स्वप्न आहे.” – आयोजक
या आगळ्या-वेगळ्या वारीतून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आस्था, नेतृत्वगुण व राष्ट्रनिष्ठा रुजेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
जय जिजाऊ! जय शिवराय!
0 टिप्पण्या