मुक्ताईनगर – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या पालखी सोहळ्याचा विधिवत शुभारंभ करत, त्यांनी पालखीचे पूजन केले व स्वतः पालखीचे सारथ्य करत वारकरी परंपरेत सहभाग नोंदवला.
या अध्यात्मिक कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद सीईओ मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संत मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व हजारो वारकरी सहभागी झाले होते.
पालखीचे सारथ्य करताना शिंदे म्हणाले, “संत परंपरा ही महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक उर्जास्थानं आहेत. संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे सारथ्य करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भक्तीमय अनुभूती आहे. संतांच्या आशीर्वादाने राज्यात चांगला पाऊस पडो, शेती बहरो आणि शेतकरी सुखी होवो हीच प्रार्थना.”
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सर्व पालख्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाकडून योग्य ती तयारी करण्यात आली आहे. सर्व पालखी प्रमुखांची बैठक घेऊन वेळापत्रक, वाहतूक, वैद्यकीय सुविधा, पालखी तळांवरील सुविधा, आणि सुरक्षा याविषयी सविस्तर नियोजन झाले आहे. विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आणि त्यांच्यासाठी सुरक्षिततेच्या अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वारकरी संप्रदाय जपण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. “पालखी मार्गावर स्वच्छतागृहे, आरोग्य तपासणी शिबिरे, पिण्याचे पाणी, स्नानगृहे यासाठीही उत्तम सुविधा दिल्या जातील,” अशी माहिती त्यांनी दिली.
love jihad 📰 बुरखा न घातल्यास जीवे मारण्याची धमकी; जळगावात 'लव्ह जिहाद' प्रकरण उघडकीस
संत मुक्ताबाईंची पालखी ही तापी नदीपासून चंद्रभागेपर्यंत, म्हणजे राज्यातील सर्वाधिक अंतर कापणारी पालखी असून, पंढरपूर वारीचे हे एक महत्त्वाचे आकर्षण आहे. यंदाही या पालखीचे टप्प्याटप्प्याने स्वागत होणार असून, संपूर्ण मार्गावर प्रशासन सज्ज आहे.
कार्यक्रमात एक खास क्षण पाहायला मिळाला –
बोधवड-जामनेर रस्त्यावरील नवीन मंदिरात पालखी पोहोचल्यावर काही महिला भगिनींनी उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रतिकात्मक राख्या बांधल्या. हा अनोखा क्षण वारकरी भावनेचे प्रतीक ठरला.
![]() |
📲 जळगाव न्यूज WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा: |
0 टिप्पण्या