राऊत म्हणाले, "गिरीश महाजन हे भाजपचे अधिकृत दलाल आहेत. त्यांना पक्ष फोडण्याचं विशेष काम दिलं आहे. महाराष्ट्रात कुणीही फुटलं, तर त्यामागे महाजन असतात." त्यांनी असा गौप्यस्फोटही केला की, "जेव्हा आम्ही सत्तेवर असू, तेव्हा गिरीश महाजन भाजप सोडतील. त्यांनी भाजपला संपवण्याचं काम केलं आहे आणि पुढेही करतील."
संजय राऊत यांनी असा दावा केला की गिरीश महाजन यांचं राजकीय वर्तन हे लोकशाहीच्या विरोधात आहे आणि ते महाराष्ट्रातील पक्षसंस्थांमध्ये अस्थिरता निर्माण करत आहेत. "भाजपने अशा लोकांवर विश्वास ठेवला आहे, ज्यांचा हेतू केवळ सत्तेसाठी लोकांना खरेदी करणे हा आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.
महाजन हे भाजपचे ‘क्रायसिस मॅनेजर’ असून, विरोधकांच्या गोटात फूट पाडणे आणि सरकार वाचवणे हे त्यांचे मुख्य काम असल्याची टीका राऊत यांनी केली. या आरोपांवर गिरीश महाजन किंवा भाजपकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
0 टिप्पण्या