Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संजय राऊत पांढऱ्या पायाचा, जिथे जातात तिथे संपते – गुलाबराव पाटलांचा रोखठोक टोला


महापालिका निवडणुकीत राऊत अपयशी ठरणार – मंत्री गुलाबराव पाटील

राजकारणातील वादग्रस्त आणि सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा थेट आणि जोरदार हल्ला चढवला आहे. “संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे, ते जिथे जातील तिथे सगळं संपतं,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

👥 जळगाव न्यूज WhatsApp 📲 ग्रुपमध्ये सामील व्हा -https://chat.whatsapp.com/GPfOU1xWIscHfOTnpd7ouM 


जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची भेट आणि जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न फसल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “राऊत म्हणाले होते की जळगावमधील पाच आमदारांना पाडू. पण त्यांच्याकडे उमेदवारसुद्धा नव्हते. एकही आमदार पाडता आला नाही.”

“राऊत जिथे जातात, तिथे अपयशच”

गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं, “महानगरपालिका निवडणुकांमध्ये काय करणार, असा प्रश्न उपस्थित होतो. राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत, ते जिथे गेले तिथे काहीही यश मिळालं नाही. विधानसभेच्या वेळी त्यांच्या उपस्थितीत असलेले लोक नाराज झाले. लोक त्यांच्या बाजूने बघायलाही तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीतही ते यशस्वी होणार नाहीत.”

सुरेशदादा जैन यांच्यावरही भाष्य

पुढे बोलताना त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. “सुरेशदादा यांनी आता राजकारण सोडलं आहे. जे चांगलं काम करत आहेत, त्यांच्या पाठीशी ते राहतात. राऊत कितीही प्रयत्न केले तरी काही होणार नाही. सुरेशदादा सर्वांसाठी वंदनीय आहेत,” असं त्यांनी नमूद केलं.

👉 WhatsApp चॅनेल जॉइन करा - https://whatsapp.com/channel/0029Vb68EiMJJhzR7qNXEn0F

सरनाईक आणि कोकाटे यांच्या वक्तव्यांवरही मत

मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “मराठी आमच्यासाठी अस्मितेचा भाग आहे. हिंदी राष्ट्रभाषा असली तरी मराठीचा अभिमान असावा. सरनाईक यांनी आपला दृष्टिकोन मांडला असेल.” कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानावर मात्र, “मला याबाबत काही माहीत नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली.

महायुतीसोबत निवडणुकीत उतरणार

महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. “निवडणुका जवळ आल्यावर सविस्तर माहिती दिली जाईल,” असंही त्यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या