YAWAL NEWS : यावल तालुक्यातील भालशिव-पिंपरी मार्गाचे काम गेल्या डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आले होते. मात्र आज सहा महिने उलटून देखील हा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही. सद्यस्थितीत संपूर्ण रस्ता कोरून ठेवलेला आहे आणि त्या कोरड्या रस्त्यावर पावसाच्या ऐन तोंडावर माती टाकून ठेवली गेली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्याचा उपयोग दररोज शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिक करत असतात. पण रस्ता अपूर्ण असल्यामुळे वाहतूक ठप्प होते, दुचाकी स्वार घसरतात, शाळेतील विद्यार्थी वेळेवर पोहोचत नाहीत. पावसाच्या काळात या मातीमुळे रस्त्याचा दर्जा अधिकच खराब होतो, चिखल होतो आणि वाहने अडखळतात. अनेक वेळा अपघाताचीही शक्यता वाढते.
या समस्येची वारंवार तक्रार करूनही स्थानिक प्रशासन, ठेकेदार, तसेच आमदार आणि खासदार याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. कामाच्या सुरुवातीला मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते, परंतु नंतर कामाचा गती मंदावली आणि अखेर थांबलेच. नागरिकांनी आशा ठेवली होती की उन्हाळ्यात तरी रस्ता पूर्ण होईल, पण आता पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि रस्ता अजूनही अर्धवट अवस्थेत आहे.
स्थानिकांनी वारंवार निवेदनं दिली असून देखील कोणतीही ठोस कारवाई होत नाही. ग्रामस्थांनी आता ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‘रस्त्याशिवाय विकास नाही’ ही भावना प्रबळ होत चालली असून जनतेचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने आणि स्थानिक प्रतिनिधींनी या बाबतीत तातडीने लक्ष घालावे, अन्यथा मोठा जनआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिक देत आहेत.
📢 आपल्या गावातील समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा!
🟢 WhatsApp करा: +91 75593 43264
📝 फोटो, व्हिडीओ किंवा माहिती पाठवा
0 टिप्पण्या