Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Suicide News “मी आत्महत्या करतोय” मेसेज पाठवत बसचालकाची रेल्वेखाली उडी



जळगाव न्यूज : बोदवड रेल्वे स्थानकावर एक हृदयद्रावक आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका वयस्कर बसचालकाने आपल्या मुलाला “मी आत्महत्या करीत आहे” असा मोबाइल संदेश पाठवून भरधाव एक्स्प्रेस ट्रेनखाली आत्महत्या केली. ही घटना बोदवड रेल्वे स्थानकाच्या उपलाईनवर शुक्रवार, ६ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

मृत व्यक्तीचे नाव कनवरलाल कन्व्हरलाल एकनाथ अठ्ठकाळे (वय ४३, रा. हरताळा, ता. मुक्ताईनगर) असे आहे. ते पुणे महानगरपालिकेमध्ये बसचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कन्वरलाल यांना फुप्फुसाचा कर्करोग झाला होता आणि ते गेल्या काही काळापासून उपचार घेत होते. या आजारामुळे शारीरिक वेदना आणि मानसिक ताण त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात होता. याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घटनेच्या दिवशी सकाळी ते पत्नीसोबत मुक्ताईनगर येथील रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्यानंतर पत्नीला घरी सोडून त्यांनी “मित्रांना भेटून येतो” असे सांगितले. मात्र, त्यांनी थेट बोदवड रेल्वे स्थानक गाठले. तेथे पोहोचल्यावर आपल्या मुलाला मोबाइलवर “मी आत्महत्या करतो आहे” असा स्पष्ट संदेश पाठवला.

सदर घटनेदरम्यान अमरावती-सुरत एक्स्प्रेस उपलाईनवरून जात होती. कन्वरलाल हे फलाटावरून खाली उतरले आणि ट्रेन येत असताना रेल्वे रुळांवर आडवे झोपले. काही क्षणांतच ट्रेन त्यांच्यावरून गेली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कन्वरलाल यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा (सध्या दहावीमध्ये शिक्षण घेत आहे) आणि नुकतेच विवाह झालेली एक मुलगी असा परिवार आहे. ते कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः मुलाला मेसेजद्वारे आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर झालेला मानसिक धक्का अतिशय मोठा आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

मानसिक आजार, शारीरिक व्याधी आणि त्यातून निर्माण होणारा तणाव याकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा घटना केवळ एक व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे वेळीच संवाद, समुपदेशन आणि आधार देणे हे महत्त्वाचे आहे.

👥 जळगाव न्यूज WhatsApp 📲 ग्रुपमध्ये सामील व्हा -


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या